तू ....
खूप वेळ झाला तरी कागद रिकामाच होता.… मनात असंख्य विचार गर्दी करत होते पण हाताला काहीच लागत नव्हत. जणू शिवा शिवीचा खेळच खेळत होते माझ्यासोबत...... शेवटी ठरवल डोळे बंद करून जे काही समोर येईल त्यावर लिहायला सुरवात करायची..... मग काय नेहमी प्रमाणे तूच जिंकलास. आजही माझ्या डोळ्या संमोर तूच आलास . मन पुन्हा एकदा तुझ्यात हरवू लागल. मी नाही नाही म्हणत असतांना देखील बेलगामपणे पुन्हा पुन्हा तुझाच पाठलाग करू लागलं. आज काल अस काय झालाय की माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसर कोणी येतच नाही फक्त तू तू आणि तू....... तू माझा नक्की कोण आहेस याच उत्तर मला अजून उमगलेल नाही. मला फक्त एवढंच माहितीये मला तुझ्यासोबत जगायचय.... आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचाय . तुझ्यात आणि तुझ्या प्रेमात मला चिंब भिजायचं, मला तुझ्यात हरवून जायचंय..... तू म्हणजे मला पडलेल सगळ्यात सुंदर स्वप्न. तू म्हणजे माझ्या मनाला व्यापून टाकणारी एक सुंदर संध्याकाळ . कस सांगू तुला कि तुझ माझं असण